शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
5
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
6
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
7
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
8
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
9
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
10
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
11
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
12
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
13
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
14
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
15
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
16
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
17
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
18
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
19
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
20
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कधी उशिरा, तर कधी चुकीची प्रश्नपत्रिका : शिवाजी विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:36 IST

कधी उशिरा, तर कधी चुकीच्या विषयांची प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार हिवाळी आणि उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांदरम्यान घडला आहे.

ठळक मुद्देनावाजलेल्या परीक्षा मंडळाचा गोंधळ; विद्यार्थ्यांना होतोय नाहक त्रास

संतोष मिठारी ।कोल्हापूर : कधी उशिरा, तर कधी चुकीच्या विषयांची प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार हिवाळी आणि उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांदरम्यान घडला आहे. त्यातून शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कामकाजातील गोंधळ आणि अनागोंदी समोर आली आहे. त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.

परीक्षाविषयक कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सर्वाधिक परीक्षा घेऊनही वेळेत निकाल जाहीर करणे याबाबत शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ राज्यात आघाडीवर आहे. त्याच्या जोरावर मुंबई विद्यापीठाला उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात मदत करण्याची जबाबदारी या मंडळावर सोपविण्यात आली होती. अशा पद्धतीने नावाजलेल्या या परीक्षा मंडळाच्या कामकाजात मात्र, सध्या काही गोंधळ आणि अनागोंदी सुरू आहे.

आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मधील (हिवाळी सत्र) आॅक्टोबरमध्ये बी. एस्सी. अभ्यासक्रमाच्या काही परीक्षार्थींना प्रवेशपत्रच मिळाले नाही.नोव्हेंबरमध्ये आॅनलाईन सांकेतिक क्रमांक समजण्यातील गोंधळामुळे एम. कॉम. भाग दोनचा पेपर परीक्षार्थींना अर्धा तास उशिरा मिळाला.

या प्रकाराच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या एम. कॉम. भाग दोनच्या पेपरवेळी पुन्हा असाच गोंधळ घडला. बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रातील चुका झाल्याचा प्रकार मार्च २०१८ मध्ये समोर आला. उन्हाळी सत्रातील परीक्षांदरम्यान बी. ए. हिंदी भाग एकच्या परीक्षार्थींना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली. यानंतर ‘एलएल. बी.’ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमातील तृतीय वर्षाच्या पुनर्परीक्षार्थींना बुधवारी (दि. २३) जुनेच प्रश्न असलेला पेपर मिळाला. परीक्षाविषयक या चुकांचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.कुलगुरूंनी लक्ष देण्याची गरजप्रश्ननियोजकाकडून प्रश्नपत्रिका तयार करणे, ती गोपनीयतेसाठी पाकीटबंद करणे. त्यासह सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी, गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण) या प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि या टप्प्यांवर होणाºया चुकांचा समावेश आहे. निकाल वेळेत लावण्याच्या कामगिरीमुळे विद्यापीठाचा राज्यात नावलौकिक आहे. परीक्षा मंडळासह एकूण विद्यापीठातील उल्लेखनीय कामगिरीमुळे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरुपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. परीक्षा मंडळाच्या कामकाजातील गोंधळ थांबविण्यासाठी कुलगुरूंनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत विद्यापीठातील विविध घटकांकडून व्यक्त होत आहे.परीक्षांविषयक आकडेवारी दृष्टिक्षेपातविद्यापीठाकडून दोन सत्रांत घेणाºया परीक्षांची संख्या११६८वर्षभरात परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या५ लाख ७५ हजारएका सत्रात तपासल्या जाणाºया उत्तरपत्रिका२२ लाख

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर